पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Record : भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 मध्ये श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. या विजयासह टीम इंडियाने घरच्या मैदानावर 11 वी मालिका आपल्या नावावर केली. भारतीय संघ 2019 पासून सातत्याने द्विपक्षीय मालिका जिंकत आला आहे.
राजकोटमधील तिसरा टी-20 जिंकण्यासोबतच भारताने इंग्लंडच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. टीम इंडियाने आता कोणत्याही एका प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक विजय नोंदवण्याच्या बाबतीत पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
आतापर्यंत हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. इंग्लंड संघाने पाकिस्तानविरुद्ध 29 सामन्यांपैकी 19 विजय नोंदवून हा विक्रम केला. पण आता भारताने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 19 सामने जिंकून इंग्लंडच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आता इतिहास रचण्यापासून केवळ एक विजय दूर आहे.
भारतीय संघाने (Team India Record) आता एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला तर तो इंग्लंडचा हा विश्वविक्रम मोडेल. या यादीत पाकिस्तानच्या संघाचेही नाव आहे. पाकिस्तानने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध 29 पैकी 18 सामने जिंकले आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका : 29 सामन्यांमध्ये 19 विजय
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान : 29 सामन्यांमध्ये 19 विजय (सुपर ओव्हरमध्ये एक विजय)
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड : 29 सामन्यांमध्ये 18 विजय
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : 25 सामन्यांमध्ये 17 विजय