शेतकरी प्रश्नी सरकार असंवेदनशील आहे. कांद्याची एवढी मोठी दिल्लीत काल मीटिंग झाली, त्यामध्ये किती मंत्री गेले? एवढा मोठा कांद्याचा विषय असताना, शेतकरी संकटात असताना, यांचे चुकीचे धोरण कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. हे मी चार महिने आधी ट्विट करून पियुष गोयल यांना सांगितलं होतं. जगात कांदा कमी आहे, तिकडे जाऊ द्या, असे मी सांगितलं होतं. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत होते, तेही यांना चांगलं दिसलं नाही. टोमॅटोला दोन पैसे मिळत असताना चुकीचे धोरण स्वीकारले. शेतकऱ्याचं कंबरडे मोडण्याचे पाप जर कोणी करत असेल, तर हे सरकार करत आहे. सरकारला शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, पक्ष फोड, नेते फोड यातच त्यांचा वेळ जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. (Supriya Sule on NCP)