अनेक ठिकाणी बस जाळण्यात आल्या तर, एसटी बसवर दगडफेक झाली. अहमदनगर जिल्ह्यात याचे पडसाद उमटू नये, यासाठी शुक्रवारी रात्रीच शहरातील तीनही बसस्थानकावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. शनिवारी सकाळीच पोलिसांनी एसटी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. प्रवाशांच्या जिवाला धोका होऊ नये, यासाठी बससेवा बंद ठेवण्याचे निर्देश दिले.