सोलापूर; ऑनलाईन पुढारी :
ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत माढ्यात सहा जागांवर काँग्रेस विजय होत साठे गटाने आघाडी कायम ठेवली आहे. वैरागमध्ये 13 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा मिळविल्या आहेत. भाजपला चार जागा जिंकल्या. शिवसेनेही खाते उघडले आहे. नातेपुतेमध्ये सहा जागांवर भाजप आघाडीवर आहे.
रेश्मा टेळे यांच्या रूपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माळशिरस नगरपंचायतीमध्ये पहिल्यांदाच आपले खाते उघडले आहे. महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीमध्ये रेडे आणि बाळासाहेब मुंडफणे यांच्या आघाडीसह काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपने निवडणूक लढवली होती. यात रेडे, मुंडफणे गटाला प्रत्येकी तीन, भाजपला एक राष्ट्रवादीला चार आणि काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. वैरागमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांना धक्का बसला आहे.
हेही वाचलं का?