पुढारी ऑनलाईन डेस्क
महाआयटीतील काहीजण पळून गेले आहेत. महाआयटी घोटाळ्याचा आरोपी अमोल काळे कुठे आहेत? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला.
संजय राऊत म्हणाले, २४५ हजार कोटींचा घोटाळा झालाय. महाआयटी घोटाळ्यातील लोकांना पळवलं. सोमय्यांची एक दिवस जनता धिंड काढणार आहे. पुनर्वसनाच्या नावाखाली ४३ बोगस लोकांची घुसखोरी झालीय. ४३३ लोकांकडून प्रत्येकी २५ लाख रुपये घेण्यात आले.
सोमय्यांनी फडणवीस, अमित शहा यांच्या नावावरही वसुली केली आहे. सोमय्यांनी केलेल्या वसुलीची फडणवीसांना कदाचित कल्पना नसावी. पुनर्वसनाचा घोटाळा आहे. फडणवीसांच्या नावावर सोमय्यांनी शेकडो कोटी रुपये गोळा केल्याच्या माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. सोमय्यांनी साडेसात हजार कोटींचा घोटाळा केला आहे. मुख्यमंत्री यांची भेट घणार असल्याचेही ते म्हणाले.