पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॅलेंटाईन डेनिमित्त तरुणांच्या गुलाबी प्रेमाच्या गप्पा सुरू असतात. पण, ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यात मोठी घडामोड घडली आहे. तिने आपला पती रितेश सिंहपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. नवऱ्यापासून वेगळं होणार असल्याची माहिती राखीने इन्स्टाग्राम अकाऊंवरून पोस्ट करून दिलेली आहे. (Rakhi Sawant)
खरंतर बिग बाॅस १५ व्या सीजनच्या माध्यमातून राखीचा नवरा रितेश पहिल्यांदाच लोकांच्या समोर आला होता. यापूर्वी त्याच्याबद्दल राखीच्या चाहत्यांना माहीत होतं; पण थेट राखी बीग बाॅसच्या या सीजननंतर आपल्या नवऱ्यापासून विलग होण्याचीच माहिती समोर आली आणि राखीच्या चाहत्यांना धक्का बसला.
"माझ्या प्रिय चाहत्यांनो आणि शुभचिंतकांनो. मी फक्त इतकंच बोलू इच्छिते की, मी आणि रितेश वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. बीग बाॅस शोनंतर खूप हालचाली झाल्या. मला काही गोष्टींची कल्पनाच नव्हती. त्या गोष्टी माझ्या नियंत्रणातदेखील नव्हत्या", असं राखीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे. (Rakhi Sawant)
राखी पुढे म्हणतेय की, "आम्ही दोघांनाही आमच्यातील मतभेद दूर करण्याचा खूप प्रयत्न केला. जेणे करून सर्व काही ठीक होईल; पण शेवटी मला असं वाटतं की, आम्ही दोघांनीही सौजन्य मार्गाने एकमेकांच्या आयुष्यातून बाजुला व्हावं आणि दोघांनी आपापल्या परीने आपलं आयुष्य आनंदीपणे जगावं. मला खंत आहे की, व्हेलंटाईन डेदिवशी मला हा निर्णय घ्यावा लागला."
"मी रितेशला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आता मला माझ्या कामावर आणि आयुष्याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वतःला आनंदी आणि आरोग्यदायी राहायला हवं. मला कायम समजून घेऊन समर्थन दिल्याबद्दल तुमचेही आभार", असं राखीने पोस्टच्या शेवटी लिहिलं आहे. राखीच्या ब्रेकमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
हेही वाचलं का?