रायगड : कशेडी बोगद्यातून प्रवासाची प्रतीक्षा संपणार; खेड-पोलादपूर मार्गिका लवकरच होणार खुली

कशेडी बोगदा
कशेडी बोगदा
Published on
Updated on

पोलादपूर ; पुढारी वृत्‍तसेवा कशेडी बोगद्यातून प्रवास करण्याची प्रतीक्षा लवकर संपुष्टात येणार असून, खेड ते पोलादपूर मार्गिका लवकरच खुली करण्यात येणार असल्याची माहिती कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बोलताना दिली. बोगद्याच्या आतील भागाच्या कामासाठी 70 कर्मचारी व इतर कामासाठी 200 पेक्षा जास्त कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. दोन जिल्ह्यातीळ डोंगर पोखरून काढण्यात आलेला भुयारी मार्ग हा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पा प्रमाणे हा बोगदा ते मुख्य महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील मलेशियन पद्धतीचा पूल आकर्षक ठरणार आहे. सदरचा पूल कोकणात पहिल्यांदा उभारण्यात येत आहे, तर राज्यात दुसऱ्यांदा या पूर्वी लातूर येथे या पद्धतीने पूल उभारण्यात आला आहे.

दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मे महिण्याच्या शेवटच्या टप्यात पाहणी केली असता, महत्वकांक्षी प्रकल्पातील खेड कडून पोलादपूर पर्यंत मार्गिका सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. त्या नुसार पुढारी टीम महाड पोलादपूर टीम ने प्रत्यक्ष भेट दिली असता, येथील कामाची माहिती घेत पाहणी केली. या वेळी उपस्थित कर्मचारी अधिकारी याच्याशी चर्चा केली.

या पावसाळ्यात जूनमध्ये या बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे, मात्र बोगदा ते मुख्य मार्गाचे काम बहुतांशी पूर्ण होत आले आहे. उर्वरित काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे, तर बोगद्याचे काम जवळपास आता अंतिम टप्प्यात आले आहे.
या बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार होणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी आता अवघड वळणांच्या कशेडी घाटातून जवळपास २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच अवजड वाहनांसाठी जवळपास ४० मिनिटांचा कालावधी लागतो. अवघड वळण घाटातून आहेत. त्यामुळे अनेकदा अपघातांचेही प्रसंग ओढवतात. पण या सगळ्याला आता उत्तम पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे.

या बोगद्यातील एक लेन जून २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी सुरू करण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या नुसार या बोगद्यातील फिनिशिंगचं काम व जोड रस्त्यांचे कामही गतीने सुरू आहे. या सगळ्या कामावरती केंद्र सरकारने नियुक्त केलेली आयएलएफ कन्सल्टंट ही कंपनी सध्या या सगळ्या कामावरती सुरुवातीपासून सुपरवायझिंग करत आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून, या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. बोगद्याची २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची आहे. भोगाव, कातळी व कशेडी या तीन गावांमधून या बोगद्याचा मार्ग जातो. बोगद्याच्या महत्त्वाच्या कामासाठी एकूण ४४१ कोटींचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला आहे.

हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी होणार असून, दोन भुयारी मार्ग असतील. नियोजनानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा हा पक्का रस्ता बोगद्याच्या कामात प्रस्तावित आहे. बोगद्यात हवा खेळती रहावी यासाठीही वायूविजन भुयार बोगद्याच्या रचनेत समाविष्ट आहे. या बोगद्यात सहा ठिकाणी जोड रस्ते असून, बोगद्यात यू टर्नची व्यवस्था आहे. अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची आपत्कालीन सुविधासुद्धा ठेवण्यात येणार आहे.

तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने केंद्र शासनाच्या सहकार्याने हे काम त्यावेळी मंजूर करून तात्काळ हाती घेण्यात आलं होते. या बोगद्याच्या सगळे काम रिलायन्स ईंन्फ्रा या कंपनीने घेतले असून, उप कंपनी म्हणून एसडीपीएल ही कंपनी काम करत आहे. २०१८ साली या बोगद्याचे काम सुरू करण्यात आलं. ऑक्टोबर २०२३ पर्यंत हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल, असे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आलं आहे. या कामाची पाहणी केंद्रीय नितीन गडकरी यांनी हवाई पाहणी केली होती. त्या नंतर राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पाहणी करत सूचना देत हलक्या वाहनांसाठी मार्गिका सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. त्याच धर्तीवर वाहतूक सुरळीत होईल याची पाहणी करण्यात येणार आहे.

या बोगद्याचे सगळे काम रिलायन्स ईंन्फ्रा या कंपनीने घेतले असून, उप कंपनी म्हणून एसडीपीएल ही कंपनी काम करत आहे. २०१८ साली या बोगद्याचे काम सुरू करण्यात आलं. ऑक्टोबर २०२३ पर्यंत हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल, असे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आलं आहे.

ऐतिहासिक रायगड व फलोत्पादन रत्नागिरी यांना जोडणारा कशेडी बोगदा हा महत्वकांक्षी असलेला प्रकल्प अंतिम टप्यात असल्याने या दोन्ही बोगद्यात नरवीर तानाजी मालुसरे यांचे तर दुसऱ्या बाजूला मुरारबाजी देशपांडे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांसह प्रवासी वर्ग करत आहे. कोकणातील हा सर्वात मोठा बोगदा असल्याने या मार्गिका मधून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरात लवकर पूर्णत्वास जाणार असल्याने शासनाने व महामार्ग विभागाने या दोन्ही भुयारी मार्गाला स्थानिक महापुरुषांची नावे द्यावीत अशी आग्रही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

महामार्ग विभागाचे अधिकारी श्रीमंती मेश्राम मॅडम व महाडकर यांनी रविवारी सुट्टीचा दिवस असताना पोलादपूर बाजू कडील रस्त्याची व बोगद्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी एक मार्गिका लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news