सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवित त्यांना दोष वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ही खासदारकी रद्द झाली होती. गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आधार गांधी यांच्यासमोर राहिला होता. अखेर गत आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना दिलासा दिला होता.
कर्नाटकमधील कोलार येथे 13 एप्रिल 2019 रोजी निवडणूक प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप झाला होता. 'निरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी या आडनावामध्ये कोणती समानता आहे?, सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?' असे गांधी त्यावेळी म्हणाले होते. यावर गुजरातमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात कलम 499 आणि 500 अंतर्गत अवमाननेचा खटला दाखल केला होता.