पुणे : पुणे जिल्ह्यातील पूर्व रिंग रोडसाठी खेड तालुक्यात युद्धपातळीवर जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल 150 कोटी रुपयांचे शेतकर्यांना वाटप करण्यात आल्याने त्यांची दिवाळी जोरात साजरी होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत तब्बल 700 कोटींपेक्षा अधिक रकमेसाठी शेतकर्यांनी संमतीपत्र दिले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. पूर्व रिंग रोडसाठी खेड तालुक्यातील 12 गावांसाठी दर निश्चित करून सध्या प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुक्यात सर्वांधिक दर चिंबळी गावात काही गटांसाठी हेक्टरी तब्बल 6 कोटी 11 लाख रुपयांचा दर मिळाल्याने शेतकरी मालामाल होणार आहेत.
संबंधित बातम्या :
तर काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकरी नाराजदेखील आहेत. परंतु जिल्हा प्रशासन, खेड उपविभागीय कार्यालयाच्या वतीने युद्धपातळीवर काम करून आठ दिवसांत तब्बल 150 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत्या चार पाच दिवसांत जास्तीत जास्त शेतकर्यांना पैसे वाटप करण्याचे नियोजन आहे. यामुळेच खेड तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतक-यांना चांगला दिवाळी धमाका होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पूर्व रिंग रोडसाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दर निश्चित करून शेतक-यांच्या संमतीने जमीन खरेदीदेखील सुरू झाली आहे. खेड तालुक्यात एका दिवसांत रेकॉर्ड ब—ेक तब्बल 100 कोटीचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत 700 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या शेतक-यांची संमतीपत्र आली आहेत. शेतक-यांसाठी प्रशासन युध्दपातळीवर काम करत आहे. मोठ्याप्रमाणात पैसे वाटप होत असल्याने शेतक-यांची फसवणूक होऊ शकते, पण शेतक-यांनी अन्य कोणावरही विश्वास न ठेवता थेट प्रशासनाशी संपर्क करावा.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे.खेड तालुक्यातील बाराही गावांतील रिंग रोड बाधित शेतक-यांना पैसे वाटप सुरू झाले आहे. यामध्ये पूर्व संमतीपत्र देणा-या शेतक-यांना प्राधान्य देऊन हे वाटप सुरू आहे. एका दिवसात सरासरी दहा फाईल काढण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यामुळे पैसे लवकर काढून देतो, जास्त पैसे मिळवून देतो, असे सांगणार्या लोकांवर, एजंटवर विश्वास ठेवू नका.
– जोगेंद्र कट्यारे, खेड प्रांताधिकारी.
या गावांतील शेतकरी मालामाल
पूर्व रिंग रोडसाठी खेड तालुक्यात 12 गावांत 614 गटांमध्ये तब्बल 292 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये खालुब—े, निघोज, माई, कुरूळी, चिंबळी, केळगाव, च-होली खुर्द, धानोरा, मरकळ, सोळू, गोलेगाव या 12 गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत शेतकर्यांनी संमती पत्र दिल्यास वाढीव 25 टक्के रक्कम मिळणार आहे.