नाशिकवरील पाणीकपातीचे संकट टळले, गंगापूर धरण ‘इतकं’ भरलं…

गंगापूर धरणातून सुरु असलेला विसर्ग  (छाया : हेमंत घोरपडे)
गंगापूर धरणातून सुरु असलेला विसर्ग (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरण सध्या ७५ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे आता पाणीकपातीचे संकट टळले आहे. मागील वर्षी जुलैअखेर गंगापूर धरणात ७३ टक्के इतका जलसाठा होता, तर यंदा ७५ टक्के इतका साठा झाला आहे. धरणात पाणी आवक वाढत असल्याने धरणातून हंगामातील पहिला विसर्गदेखील करण्यात आला आहे.

मात्र शहरात पाहिजे तसा पाऊस अद्याप झाला नाही. गंगापूर धरण समूहातील अन्य धरणांमधील पाण्याची पातळी मात्र अजूनही अपुरी असल्याने ही धरणे भरण्याची प्रतीक्षा आहे. समूहातील काश्यपीमध्ये ४०, गौतमी गोदावरीत ४१, तर आळंदी धरणात केवळ ३४ टक्के इतकाच पाणीसाठा जमा होऊ शकला आहे. समूहातील एकूण टक्केवारी ५८ टक्के असून, मागील वर्षी समूहातील टक्केवारी जुलैअखेर ८१ इतकी होती.

पाणीसाठ्यात सातत्याने वाढ

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा साठा नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली असताना गंगापूर धरणात पाणी आवक झाल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सद्यस्थितीत ४१४२ दलघफू म्हणजेच ७४ टक्के पाणीसाठा आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नियंत्रित साठ्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news