सतत झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पातीमध्ये पाणी शिरल्याने कांदाचाळीतील ९० टक्के कांद्याचे नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ नुकसान भरपाई घ्यावी. – रवींद्र पाटील, शेतकरी.
शेतात काढलेला कांदा १५ दिवसात सडला. मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी कांद्याच्या गाभ्यात शिरले. कांदा काढणीनंतर टिकेल असे वाटले होते. परंतु पंधरवड्यातच कांदा सडला आहे. परिणामी कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. – बाळासाहेब पाटील असोली.
मार्च व एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवेदन दिले. पंचनामे देखील झाले. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसून आता हाच साठवणूकीतील कांदा चाळीत सडत आहे. शासनाने तत्काळ उपायोजना करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. – जे. पी. गावित, माजी आमदार.