नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
शेतजमीनीत टोमॅटो व कांदा उत्पादीत होतो आहे. मात्र मुरमुरा कारखान्याच्या दुषित पाणी व कारखान्यातून निघणाऱ्या रेतीयुक्त धुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने मुरमुरा कारखानदाराला पाठीशी न घालता त्वरीत कारवाई करावी. – हर्षल जाधव, शेतकरी, वणी.
मुरमुरा कारखान्याच्या धुरामुळे द्राक्ष पिकावर विपरित परिणाम झाला होता. कमी दरात द्राक्ष विक्री करावी लागल्याने बँकेचे कर्ज कोठून भरायचे ? नाईलाजाने चार एकर द्राक्ष बाग तोडून टाकली आहे. मुरमुरा कारखान्यावर कारवाई करावी व तो कायमस्वरुपी बंद करण्यात यावा. नाहीतर शेतकऱ्यांच्या जमिनी मुरमुरा कारखानदाराने विकत घ्यावात. बाजारमुल्यानुसार आम्ही विक्री करण्यास तयार आहोत. -सचिन पवार, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक, वणी.
वणी गट ५१० मध्ये असलेल्या मुरमुरा कारखान्यातून दुषित पाणी काजळीयुक्त धुरामुळे आजुबाजुस असलेल्या शेतक-यांना नाहक त्रास होत असल्याचा अर्ज मिळाला आहे. संबंधित कारखान्याची दुषित पाणी, धुराची चौकशी करून नोटीस बजावण्यात येईल. तसेच प्रदुषण नियंत्रण विभागाच्या निकषा नुसार अटी शर्ती नुसार करण्याच्या सुचना देण्यात येतील. – जी आर आढाव, ग्रामविकास अधिकारी, वणी.