मुंबई : सुट्टीच्या बनावट परिपत्रकामुळे पालकांमध्ये गोंधळ !

file photo
file photo

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या लेटरहेडवर तारखा बदलून 28 जुलैला पावसाच्या रेड अलर्टमुळे महापालिका शाळांसह खाजगी शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याचे परिपत्रक सकाळपासून सोशल मीडियावर फिरत होते. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालकांमध्ये अक्षरशः गोंधळ निर्माण झाला होता. काही शाळा व्यवस्थापनने शहानिशा न करता सकाळच्या शाळा सोडून दिल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत पालिकेने खुलासा केला आहे. मुंबईसाठी आज पावसाचा येलो अलर्ट आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने आज शाळा, महाविद्यालये यांना कोणतीही सुटी जाहीर केलेली नाही. सुटी जाहीर केल्याचे एक बनावट पत्र समाज माध्यमातून प्रसारित झाले. त्यावर कृपया विश्वास ठेवू नये, असे पालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news