नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण चार पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचा काल (दि.२) निकाल लागला. यानंतर आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी बोलत असताना म्हणाले,"नाशिकमध्ये कॉंग्रेसचे घर फोडण्याचे जे काम केले ते आमच्या जिव्हारी लागले आहे. आज आमचा एक नेता नेला; पण आम्ही नाशिक मतदारसंघातील भाजपमधील ५० नेते नेऊ, अशी आम्ही रणनिती आखली आहे. आमची किती घरे फोडत आहेत ते आम्ही पाहू. ते ज्या घरातून आले आहेत म्हणजे नागपूर तेथेच त्यांचा पराभव झाला आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, घर फोडण्याचे परिणाम भाजपला भविष्यात भोगावे लागतील. सत्यजीत तांबे यांच्या बाबतीत सविस्तर प्रस्ताव येईपर्यंत कोणताही निर्णय घेणार नाही. हायकमांड यांचा निर्णय घेतील, असे ते म्हणाले.