मुंबई; पुढारी ऑनलाईन : सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत देण्यात येणार असून त्यासाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे आता कंत्राटी ग्रामसेवकांना १६ हजार रुपये मिळणार आहेत. (Maharashtra Cabinet Decisions)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
हे ही वाचा :