पुढारी ऑनलाईन डेस्क: जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये कालपासून (दि.२५) चकमक सुरूच आहे. यामध्ये आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पडताळली जात आहे. तसेच अद्याप चकमक सुरुच असल्याचे काश्मीरच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे. या संदर्भातील माहिती काश्मीर झोन पोलिसांनी त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून दिली आहे. असे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छल सेक्टरमध्ये चकमक सुरू झाली. यामध्ये आज (दि.२६) सकाळी दोन दहशतवादी मारले गेले. तर त्यानंतर तीन दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात आला. अद्याप चकमक सुरुच असून, भारतीय सैन्याकडून या भागात शोधमोहिम सुरू आहे. बुधवारी (दि.२५) जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह भारतीय सैन्याच्या जवानांच्या संयुक्त कारवाईत कुपवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या चकमकीत आतापर्यंत एकून ५ दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांना यश आले आहे.