काँग्रेसने खुलेपणा, प्रामाणिकता व भेदभावविरहित काम करावे, असे सांगतानाच यातील एकही गुण भाजपकडे नसल्याचा टोला खा. सिब्बल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मारला. अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पुढील वर्षीच्या मध्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.