IPL 2022 : रवी शास्त्रींचा सल्‍ला, “विराटने आयपीएलमधून….”

IPL 2022 : 'तर विराटने आयपीएलमधून बाहेर पडावे' रवी शास्त्रींचा विराट कोहलीला सल्ला www.pudhari.news
IPL 2022 : 'तर विराटने आयपीएलमधून बाहेर पडावे' रवी शास्त्रींचा विराट कोहलीला सल्ला www.pudhari.news

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने आयपीएलमधून बाहेर पडावे आणि काही काळ विश्रांती घ्यावी. त्‍याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर लक्ष्य केंद्रित करावे,असा सल्‍ला भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्‍त्री यांनी दिले आहे.

एका युट्यूब चॅनेलशी बाोलताना रवी शास्त्री म्‍हणाले, सध्या काही काळासाठी विराट कोहलीने विश्रांती घेतली तर पुढील ६-७ वर्षे तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल. विराट गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्यामुळे विराटचा फॉर्म  परत येण्यासाठी त्याने विश्रांती घेणेचं योग्य ठरेल.

यंदाचा सीझनमधील विराटची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत ९ सामन्‍यांमध्‍ये त्‍याने १६च्‍या सरासरीने केवळ १२८ धावा केल्‍या. ४८ धावा ही त्‍याची सर्वोत्तम खेळी आहे. आरसीबी अजून पाच सामने खेळणार आहे. या सामन्‍यांमध्‍ये तरी विराटने आपल्‍या नावाला साजेसा खेळ करावा, अशी अपेक्षा चाहते व्‍यक्‍त करत आहेत.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news