नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.यापैकी बहुतांश राज्यांमध्ये तापमान ४३ अंश सेल्सिअसवर किंवा त्यापुढे पोहोचले आहे. उर्वरित उन्हाळ्यातही विक्रमी उष्णता होण्याची शक्यता आहे. ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट असताना भारतीय हवामान खात्याने राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, केरळ आणि सिक्कीम या राज्यांमध्ये मात्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश अशा डोंगराळ राज्यांमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी सुरू आहे तर याच राज्यांमध्ये काही ठिकाणी आणखी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. Heat Wave