नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: मागील नऊ वर्षाच्या कालावधीत कृषी क्षेत्राच्या तरतुदीत पाचपटीने वाढ झाली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.२४) वेबिनारच्या माध्यमातून दिली. मागील आठ वर्षांप्रमाणे या वेळचा केंद्रीय अर्थसंकल्प सुध्दा कृषी केंद्रित असल्याचे सांगितले. तसेच तेलबिया आणि खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्भरता देखील कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
आम्ही सत्तेत आलो तेव्हा कृषी क्षेत्रासाठीची तरतूद केवळ 25 हजार कोटी रुपये इतकी होती. मात्र आता ती पाचपटीने वाढून सव्वा लाख कोटी रुपयांवर गेलेली आहे. याशिवाय धान्य आणि तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार मिशन मोडवर काम करीत आहे, असे मोदी यांनी सांगितले.