सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कवठेमंकाळ, कडेगाव, खानापूर या तीन नगरपंचायतीच्या 39 जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी साडे नऊ पर्यंत सरासरी 15 टक्के मतदान झाले आहे.
यामध्ये कवठेमंकाळ 14.2, कडेगाव 12.37, खानापूर 17.58 टक्के इतके मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात मतदारांनी मतदान करण्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवला आहे. तिन्ही नगरपंचायतीमध्ये एकूण 51 जागांसाठी निवडणूक होणार होती. परंतु ऐनवेळी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने यामधील प्रत्येकी चार अशा बारा जागांची निवडणूक प्रक्रियेला निवडणूक आयोगाने तात्पुरती स्थगिती दिली होती.
यानंतर ओबीसी आरक्षणाच्या जागा खुल्या करण्याचा निर्णय झाल्याने या 12 जागांची निवडणूक प्रक्रिया दि.18 जानेवारी रोजी होणार आहे. तर उर्वरित 39 जागांची निवडणूक प्रक्रिया सध्या पार पडत असून या जागांसाठी आज मतदान होत आहे. तिन्ही ठिकाणी सरासरी पंधरा टक्के मतदान झाले आहे.
हेही वाचलत का?