पुणे : समाजात वावरताना अनेकदा समाजविघातक कृत्ये, अपघात, अन्याय-अत्याचाराच्या प्रसंगांच्या वेळी उपस्थित नागरिक केवळ मूक साक्षीदार बनतात. काही प्रसंगांत पीडितांच्या मदतीला धावण्याची इच्छा असते. पण, कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भीती वाटते. त्यामुळे पीडितांच्या मदतीसाठी कुणी पुढे येत नाही. काही जण धाडसाने पुढे येतात. मात्र, प्रत्यक्षात न्यायालयात हजर राहिल्यानंतर त्यांना आरोपींसमोर अथवा बाजूला उभे केले जाते. न्यायालयातील या परिस्थितीमुळे पीडिता व साक्षीदारांना आरोपी व त्याच्या कुटुंबीयांच्या दबावाच्या सावटाखालून जावे लागते. या वेळी त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे चित्र आहे.