नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'बीआरओ'ने पूर्ण केलेल्या प्रकल्पांमुळे सशस्त्र दलांची परिचालन तयारी करण्यात आली आहे. तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक-आर्थिक विकासात वाढ झाली आहे. सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांचा विकास मजबूत, सुरक्षित आणि स्वावलंबी 'नवीन भारत' निर्माण करण्याच्या सरकारच्या अटल वचनबद्धतेचे निदर्शक आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी (दि.7) केले. ते 'बीआरओ'च्या 63 व्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते.