आपणास पसंत पडो अथवा ना पडो, नामांतरणाचा निर्णय लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारने घेतलेला आहे. शहरे, रस्ते इत्यादींची नावे निवडणारे आम्ही कोण आहोत?. याबाबतचे निर्णय सरकारने घ्यायचे आहेत, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले. याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना अॅड. संजय हेगडे यांनी शहराबरोबर तालुक्याचे नाव बदलले जात असल्याचे नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने याआधीही मार्च महिन्याच्या अखेरीस औरंगाबादच्या नामांतरणाला आव्हान देणारी एक याचिका फेटाळून लावली होती.