नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी (Assembly Winter Session) अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून, आकड्यांची धूळफेक केली. महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा सणसणीत आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते नाना पटोले, सुनिल केदार, सुनिल प्रभू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.