![Aamir Khan](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F08%2FAMIR-KHAN.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आमिर खान ( Aamir Khan) लवकरच दिग्दर्शक करण जोहरचा प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण' सीझन ७ च्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहे. याआधी आमिरने त्याच्या दोन्ही पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्या वैवाहिक जीवनातील खास गोष्टीचा उलघडा एका मुलाखतीत केला आहे.
मध्यतंरी आमिर खान ( Aamir Khan ) आणि त्याच्या पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी संबंध चांगले नसल्याची माहिती समोर आली होती. यादरम्यान आमिरची पत्नी किरण रावच्या घटस्फोटाचीदेखील जोरदार चर्चा रंगली होती. याबाबबत दोघांच्यात सर्व काही ठिक असल्याची माहिती आमिरने स्वत: सोशल मीडियावर दिली होती.
याचविषयी बोलताना मुलाखतीत आमिर खान म्हणाला की, रीना दत्ता आणि किरण राव दोघींबद्दल माझ्या मनात खूप आदर असून आम्ही पुढे एकत्रित कुटुंबात राहू शकतो. आम्ही कितीही कामात बिझी असलो तरी वेळात -वेळ काढून आठवड्यातून एकदा तरी एकमेकांना भेटतो. आम्ही नेहमी एकमेकांची काळजी, प्रेम आणि आदर करत असतो, असे त्याने म्हटले आहे. यावेळी आमिर खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर शोमध्ये दिसली आहे.
'कॉफी विथ करण' शोच्या शेवटच्या सीझनमध्ये आमिर खान एकटाच आला होता. त्यावेळी त्याने २००२ मध्ये पहिली पत्नी रीनासोबत घटस्फोट घेणं किती अवघड असल्याचे सांगितले होते. माझे आणि रीनाचे १६ वर्षे जुनं नाते आहे. दोघांचे विभक्त होणे आमच्यासाठी तसेच मुले जुनैद आणि आयरा यांच्यासाठी सोपे नव्हतं. आम्ही या परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. पण वेगळे झाल्यानंतरही आमच्यातील एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर कमी झालेले नाही. घटस्फोटोनंतरही पत्नी रीनाने तिच्या आयुष्यात येण्याची संधी मला दिल्याने तिचे आभार मानतो असेही तो पुढे म्हणाला.
आमिर खानने पहिली पत्नी रीना दत्ताशी १९८६ मध्ये लग्न केले होतं. आमिरचे रीनावर खूपच प्रेम होते, परंतु, हे नाते फार काळ टिकले नाही. आमिर आणि रीना दोघांचा २००२ मध्ये घटस्फोट झाला. रीनाला आयरा आणि जुनैद अशी दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर आमिरने २००५ मध्ये किरण रावशी लग्न केलं आहे. परंतु, याच्याही २०२१ मध्ये घटस्फोटोची चर्चा जोरदार रंगली. किरणला आझाद राव हा मुलगा आहे. यानंतर आमिरने स्वत : सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्व काही ठिक असल्याचे सांगितले होते.
हेही वाचलंत का?