भिवंडी : पुढारी वृत्तसेवा; भिवंडीत ३ मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ५० लोक अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. अग्निशमन दलासह पोलिस आणि आपत्कालीन बचाव पथके घटनास्थळी असून येथे बचावकार्य सुरु आहे.
भिवंडीतील वळ ग्रामपंचायतच्या वळपाडा येथे ही दुर्घटना घडली आहे. भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथील वर्धमान ही तळ अधिक दोन मजली इमारत शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीच्या तळमजल्यावर गोदाम असून तेथे ३० ते ३५ कामगार काम करीत होते. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर रहिवासी रहात होते. घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून तहसीलदार अधिक पाटील यांनी एनडीआरएफ व टीडीआरएफ यांना पाचारण केले आहे.
हे ही वाचा :