Kolhapur Band : कोल्हापुरातील तरुणांनी भावनेच्या आहारी जावू नये : राजू शेट्टींचे आवाहन
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणीतरी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकते आणि संपूर्ण समाजाला वेठीस धरण्याचा प्रकार होतो, याचा विचार होणे गरजेचे आहे. कोल्हापुरातील तरुणांनी भावनेच्या आहारी जावू नये, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. (Kolhapur Band)
औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. आजही सकाळपासून काही परिसरात प्रचंड तणाव होता. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही भागात तोडफोड झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. पाेलिसांनी तत्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Kolhapur Band : दोन समाजात तेढ निर्माण होणे दुर्दैव
काेल्हापुरातील तणावपूर्ण परिस्थितीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर ही शाहू महाराज यांची पुरोगामी नगरी आहे. येथे दोन समाजात तेढ निर्माण होणे दुर्दैवी आहे. कोणीतरी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकते आणि संपूर्ण समाजाला वेठीस धरण्याचा प्रकार होतो, याचा विचार होणे गरजेचे आहे. कोल्हापुरातील तरुणांनी भावनेच्या आहारी जावू नका, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.
हेही वाचा :
- Kolhapur News | कोल्हापुरात तणाव, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
- Kolhapur News | कोल्हापुरात तणाव, जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज
- “अशा प्रवृत्तींना सत्ताधारीच प्रोत्साहन देतात”; कोल्हापूर, संगमनेर प्रकरणावरून शरद पवारांचा गंभीर आरोप
- Kolhapur News : कोल्हापुरातील तरुणांनी भावनेच्या आहारी जावू नये : राजू शेट्टींचे आवाहन
- कोल्हापूर शहरात इंटरनेट बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाचे मोबाईल कंपन्यांना आदेश