‘पंतप्रधानांच्या वाढदिनी विक्रमासाठी १० दिवस आधी कमी लसीकरण’
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी लसीकरणाचा विक्रम करता यावा यासाठी १०-१२ दिवस आधी लसीकरण कमी करण्यात आले. परिणामी देशभरात अनेक ठिकाणी लशीचा तुटवडा होता, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस दररोज साजरा व्हावा, अशी उपरोधिक टीका पी. चिदंम्बरम यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतात १७ सप्टेंबर रोजी अडीच कोटी लसींचे डोस देण्याचा विक्रम करण्यात आला.
मोदी यांच्या वाढदिवशी लसींच्या डोसचा उच्चांक झाला आहे. आतापर्यंत सर्वांत वेगाने लसमात्रा देण्याची ही पहिलीच वेळ होती.
पंतप्रधान मोदी यांना ही वाढदिवसाची भेट आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले होते.
त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापुढेही २.१ कोटी लसीकरण होणारे अनेक दिवस येवोत.
आपल्या देशाला अशाच वेगाची गरज आहे, असे ट्विट केले होते.
- मुंडे प्रकरण : करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला
- अमरिंदर सिंग काँग्रेस सोडणार? ‘अपमान सहन करून काँग्रेसमध्ये राहणार नाही’
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा विक्रम करण्यात यावा यासाठी १५ ते २० दिवस आधी लसीकरण कमी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी हा आरोप केला.
‘मोदींच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्यात आला आहे.
जवळपास पावेन तीन कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
जर आज हे लसीकरण पावने तीन कोटी झालं आहे तर तेवढंच आज, उद्या किंवा महिनाभर का होणार नाही.
एवढ्या मोठ्या लसीकरण करण्यासाठी १५ ते २० दिवस लसीकरण कमी करण्यात आलं. कारण पंतप्रधानांच्या वाढदिवशी विक्रम करण्यात येईल.
- अमरिंदर सिंग- सिद्धू वाद ; काँग्रेसने बोलविली आज आमदारांची बैठक
- सातारा : गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी; कृत्रिम तळ्याची निर्मिती
हे अन्यायकारक
जर आधीच लोकांना लस देण्यात आली असती तर त्याचा फायदा अधिक झाला असता पंतप्रधानांच्या वाढदिवशी विक्रम करण्यासाठी १५ ते २० दिवस आधी लसीकरण कमी करण्यात आले.
कोणत्याही व्यक्तीच्या गौरवासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अन्यायकारक आहेत.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आला.
त्यानिमित्त देशात विक्रमी लसीकरण झालं आहे. बिहारमध्ये लसीचे सर्वाधिक डोस देण्यात आले.
को-विन पोर्टलवर उपलब्ध आकडेवारीनुसार, शुक्रवारी रात्री ११:२० पर्यंत दोन कोटी ३७ लाख, ७३ हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत.
त्यामुळे आतापर्यंत देशभर दिल्या गेलेल्या एकूण लसींच्या डोसची संख्या ७९ कोटी, १३ लाखांहून अधिक झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
हेही वाचा :