पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील धोकादायक नसलेले १४ धबधबे वन खात्याने लोकांसाठी खुले करून दिले असून या धबधब्यांची यादीही जाहीर केली आहे. वन खात्याच्या या निर्णयामुळे पावसाळी पर्यटनासाठी गोव्यात येणारे पर्यटक तसेच स्थानिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. (Goa Waterfall's)
सत्तरीतील पाली, हिवरे, चरावणे, गोळावली, सुर्ला, चिदंबरम, नानेली, उकायची खाडी, कुमठळ, मडयानी-गुळेली व खाडी-गुळेली याशिवाय मायडा-कुळे, भाटी-नेत्रावळी आणि कुस्के-खोतिगाव हे १४ धबधबे वन खात्याने लोकांसाठी खुले करून दिले आहेत.
यावर्षी धबधबा परिसरात आंघोळीसाठी गेलेल्या सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे वन खात्याने सर्वच धबधब्यांवर लोकांना जाण्यासाठी बंदी घातली होती. या निर्णयामुळे पर्यटक आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर धोकादायक नसलेले १४ धबधबे वन खात्याने पर्यटकांसाठी खुले केले आहेत.
हेही वाचा :