Parenting tips Sadguru: 'मुलांचे मालक बनू नका...'; सद्गुरूंचा पालकांना स्पष्ट इशारा

सद्गुरुंनी पालकांना मुलांचे पालनपोषण करताना त्यांना एक स्वतंत्र जीवन म्हणून पाहण्याचा सल्ला दिला आहे.
Parenting tips Sadguru
Parenting tips Sadguru
Published on
Updated on

प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी अलीकडेच पालकत्वावर एक महत्त्वपूर्ण मत मांडले आहे, जे आजच्या पालकांसाठी विचार करायला लावणारे आहे. पालकांनी 'माझा मुलगा/मुलगी फक्त माझा/माझी आहे' हा विचार सोडून दिला पाहिजे, अशी स्पष्ट चेतावणी सद्गुरुंनी दिली आहे. जर पालकांनी हा भ्रम सोडला नाही, तर मोठे झाल्यावर त्यांची मुले स्वतःच हे सांगतील की 'मी तुमचा नाही', असेही ते म्हणाले.

'तुमचं मुल तुमचं आहे' हे बकवास

एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये भारतीय योगी, लेखक आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरु म्हणाले की, "तुमचा मुलगा तुमचा आहे, ही निरर्थक गोष्ट सोडून द्या." तुमचा मुलगा फक्त तुमचाच आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तो किशोरवयीन झाल्यावर स्वतःच तुम्हाला सांगेल की, 'मी तुमचा नाही'. ते पुढे म्हणतात की, मूल तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जे तुम्ही समजू शकत नाही. जर एखाद्या दुसऱ्या जीवाने तुमच्यासोबत राहण्याची निवड केली असेल, तर त्याचे मोल जाणून घ्या, कारण ही एक मोठी गोष्ट आहे.

Parenting tips Sadguru
Parenting tips in Marathi | तुम्हाला तुमचं बोलकं, आत्मविश्वासू मूल हवंय? मग ही वेबस्टोरी नक्की वाचा

मालक होण्याचा भ्रम सोडा

सद्गुरु स्पष्ट करतात की, मग ते तुमचे पती-पत्नी असोत किंवा मुले, तुम्ही कोणत्याही अर्थाने त्यांचे मालक नाही आहात. जर तुम्ही ही गोष्ट आता नाही समजलात, तर एकतर तुमचा मृत्यू झाल्यावर किंवा त्याचा मृत्यू झाल्यावर तुम्हाला ते मान्य करावेच लागेल.

Parenting tips Sadguru
Parenting tips| तुमची मुलं खूप हट्टी व चंचल आहेत का? ही सोपी ट्रिक्स एकदा नक्की वापरा

जीवनाचा आदर करा

जर एखाद्या दुसऱ्या जीवाने तुमच्या माध्यमातून या जगात येण्याचा किंवा तुमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याचे महत्त्व जपा आणि त्याचा आदर करा. तुम्ही त्याच्या जीवनाचे मालक आहात, असा विचार करू नका.

Parenting tips Sadguru
Parenting Tips: मुलांना लावा अभ्यासाची गोडी, 5 Tips

मोठे झाल्यावर मुले का दूर होतात?

या संदर्भात, सद्गुरुंनी एका यूट्यूब व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की, मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांपासून दूर होण्याचे कारण म्हणजे, २१ वर्षांनंतर आनुवंशिकतेचा (Genetics) स्मृतीवर होणारा परिणाम हळूहळू कमी होतो आणि त्याची भूमिका खूप किरकोळ राहते. यामुळे, जी मुले पूर्वी त्यांच्या पालकांशी खूप जोडलेली होती, ती अचानक या वयात तेवढे जुळलेले वाटत नाहीत, ज्यामुळे अनेक पालकांना आश्चर्य वाटते. सद्गुरुंनी पालकांना मुलांचे पालनपोषण करताना त्यांना एक स्वतंत्र जीवन म्हणून पाहण्याचा सल्ला दिला आहे, त्यांच्यावर मालकी हक्क न गाजवता त्यांचे प्रेम आणि आदर जपण्यास सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news