Premanand Maharaj: सुखी आयुष्यासाठी 'या' ४ गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात; काय सांगतात प्रेमानंद महाराज?

आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी खासगी ठेवणेच शहाणपणाचे असते. प्रेमानंद महाराजांनी नेमकं काय सांगितले पाहा...
Premanand Maharaj
Premanand Maharajfile photo
Published on
Updated on

Premanand Maharaj

जीवनात सुख, सुरक्षितता आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींमध्ये संयम आणि समजूतदारपणा असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट सार्वजनिक करणे किंवा तिचा दिखावा करणे नेहमीच फायदेशीर ठरत नाही. अनेकदा आपली छोटीशी चूकही ईर्ष्या, नुकसान किंवा नात्यात दुरावा निर्माण होण्याचे कारण बनते. म्हणूनच, जीवनातील मोठी शिकवण हीच आहे की, आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी खासगी ठेवणेच शहाणपणाचे असते.

याच विषयाशी संबंधित एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना प्रश्न विचारला की, "महाराज, भजन, भोजन, खजिना आणि मैत्री या गोष्टी गुपित असाव्यात असे का म्हटले जाते?"

Premanand Maharaj
Premanand Maharaj: 'घोर कलियुग येणार, नात्यांच्या मर्यादा संपणार'; प्रेमानंद महाराजांनी सांगितले कोणकोणती दुःखे भोगावी लागणार

प्रेमानंद महाराजांनी काय उत्तर दिले?

या प्रश्नाचे उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणतात की, या गोष्टी उघड केल्याने तुमच्या आयुष्याला दृष्ट लागते आणि त्यामुळे तुमचे नुकसान होते. उदाहरण देताना ते म्हणाले, "समजा तुमच्याकडे सध्या १० लाख रुपये आहेत आणि तुम्ही ही गोष्ट इतरांना सांगितली, तर ते पैसे तुमच्याकडे एक तासभर सुद्धा टिकणे कठीण होईल. कोणी ना कोणीतरी युक्ती करून तुमचे पैसे घेऊन जाईल."

भजन हे देखील अनोखे धन

महाराज पुढे म्हणतात की, भजन देखील अशाच धनासारखे असते. भजन ही आपली साधना आणि मर्यादा असते. त्याचप्रमाणे आपला खजिना आणि आपले प्रेम या सर्व गोष्टी लपवून ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही त्या गोष्टी लपवल्या नाहीत, तर त्या कमी होतील.

आपल्या ईश्वरावरील प्रेमाला नेहमी गुप्त ठेवावे. तुम्ही तुमचे ज्ञान, विज्ञान आणि अनुभव जितके जास्त गुप्त ठेवाल, तितकी त्यात वाढ होईल. जर तुम्ही या गोष्टींचे प्रदर्शन केले, तर नक्कीच सर्व काही नष्ट होईल.

अनुभव काय सांगतो?

महाराज आपल्या अनुभवातून सांगतात की, आपली साधना नेहमी गुप्त ठेवली पाहिजे. इतकेच नाही तर आपली दिनचर्या देखील सर्वांसमोर मांडू नये. तुम्ही जे भजन करता, त्याबद्दल कधीही कोणाला कळू नये. तुमची पवित्र दिनचर्या जोपर्यंत गुप्त आहे, तोपर्यंतच त्याचे फळ मिळते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमचे पैसे लपवून ठेवता, त्याचप्रमाणे तुमचे भजनही जपून आणि लपवून ठेवा.

Premanand Maharaj
Premanand Maharaj: मृत्यूनंतर सगळी नाती तुटतात? प्रेमानंद महाराज काय म्हणतात?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news