गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

File Photo
File Photo
Published on
Updated on

गडचिरोली;पुढारी वृत्तसेवा: शेतात गेलेल्या एका इसमास वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील बोरीचक या गावानजीक घडली. सध्या शेतातील कामे सुरू असून, यादरम्यान शेतात कामासाठी गेला असता, वाघाने अचानक हल्ला केल्याने सागर आबाजी वाघरे (४५) या व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला. या महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या खरीप हंगाम सुरु असल्याने सागर वाघरे हे आपल्या शेतावर  गेले होते. परंतु झुडुपात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक वाघरे यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोर्ला वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. रविवारी(ता.२६) सकाळी पोर्ला येथे एका युवकास वाघाने ठार केले होते. ही घटना ताजी असतानाच आज बोरीचक येथे दुसरी घटना घडली. शेतीचा हंगाम सुरु असताना वन्यजीव-मानव संघर्ष सातत्याने होत असल्याने शेतीची कामे कशी करायची, या भीतीने शेतकरी त्रस्त आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news