देशातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा दर सर्वाधिक

देशातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा दर सर्वाधिक
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील या २५ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. या जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गदर ५ ते ४२ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मिझोरममध्ये सेरचिप जिल्हयाचा कोरोनाचा दर सर्वाधिक ४२.३२% नोंदवण्यात आला आहे.

तसेच, जिल्ह्यातील दर १०० पैकी ४२ नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग आढळत आहे. तर, मिझोरमधील सितोल जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोना संसर्गदर ३८.६१% आहे. आसाम मधील लखीमपुर २०%, हरियाणातील गुरूग्राममध्ये १४.९३%, फरिदाबाद ११.३८% नोंदवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पितीचा कोरोना संसर्ग दर २५%, दिल्ली ५%, नोएडा १०.८६%, राजस्थानमधील धोलपुर ११.९७%, मध्यप्रदेशातील देवासचा कोरोना संसर्ग दर ७.५१ टक्के नोंदवण्यात आला आहे.

देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या गेल्या महिन्याभरात ६९.५४ टक्क्यांनी वाढली आहे. २ एप्रिल रोजी देशात ११ हजार २८७ कोरोनाबाधित होते. पंरतु दोन मे पर्यंत ही संख्या १९ हजार १३७ पर्यंत पोहचली आहे. गेल्या आठवड्याभरात देशातील २ हजार ५२० सक्रिय रुग्णांची वाढ झाली आहे. १९ ते २५ ते एप्रिल दरम्यान २ हजार ६६७ आणि १२ ते १८ एप्रिल १ हजार १७२ सक्रिय कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. देशात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज सरासरी २०० ते ६०० ने वाढ होत आहे.

हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news