बी. एड्.च्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून बारावीपर्यंत शिक्षक होण्याची संधी नवीन शैक्षणिक धोरणानुसार निर्माण झाली आहे. त्यामुळे
बी. एड्.कडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. किमान खासगी शिकवण्या तरी घेता येतील. याचा विद्यार्थी विचार करतात. परंतु, शासनाकडून शिक्षकभरतीच्या वल्गना करण्यात येत असल्या, तरी संचमान्यता झाल्यानंतर शिक्षकभरतीचा फुगा फुटण्याची शक्यता आहे.
– संतोष मगर, संस्थापक-अध्यक्ष,
डीटीएड-बीएड स्टुंडट असोसिएशन मध्यंतरी शिक्षकभरती प्रक्रिया पूर्णपणे थंडावली होती. परंतु, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकभरती होत आहे. तसेच 2012 पासून शिक्षकभरती नसल्याने मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. शासनाच्या वेगवेगळ्या घोषणांपैकी मोठ्या प्रमाणावर शिक्षकभरती केली जाईल, असे आश्वासक चित्र समोर येत आहे. याचाच परिणाम म्हणून या वर्षी शिक्षक होण्यासाठी डी. एड्. आणि बी. एड्. प्रवेशासाठी पदवीधारकांचा मोठ्या प्रमाणावर ओढा दिसत आहे.
– महेंद्र गणपुले, प्रवक्ते, मुख्याध्यापक महामंडळ