मनोरंजन

Ratris Khel Chale 3 : पूर्वाचं लग्न निर्विघ्न पार पडणार का?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन; छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले ३' ( Ratris Khel Chale 3) या मालिकेने चाहत्यांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेला पहिल्या पर्वापासून चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे आणि म्हणूनच या मालिकेचे ३ पर्व लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले आहेत. या मालिकेत चाहत्यांना पूर्वाचं लग्न होताना पाहायला मिळणार आहे. परंतु, या मालिकेत पुर्वाच्या लग्न निर्विघ्न पार पडेल का? यांची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

'रात्रीस खेळ चाले ३' ( Ratris Khel Chale 3) मालिकेत नुकतंच पूर्वाचं लग्न पुन्हा लावून देण्यासाठी अभिराम प्रयत्न करत असल्याचे दिसते. त्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश देखील आलं आहे. पूर्वाच्या सासरकडून लग्नाचा होकार आला आहे. त्यामुळे वाड्यात सगळे लग्नाच्या तयारीला लागले आहेत.परंतु, याच दरम्यान वच्छीला हसणारे अण्णा दिसतात. तिला लग्नकार्यात काहीतरी अशुभ घडेल याची कुणकुण लागते.

यानंतर अभिराम ठामपणे घरच्यांना सांगतो की, काळजी करू नका काहीही झालं तरी लग्न नीट पार पाडण्याची जबाबदारी मझी आणि कावेरीची आहे.पण सयाजी आणि कावेरी अण्णा – शेवंताच्या तावडीतून सुटण्यापेक्षा अधिकच त्यांच्या कात्रीत अडकत चालले आहेत. यामुळे पूर्वाचं लग्न निर्विघ्न पार पडेल का? यांची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.

हेही वनाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT