मनोरंजन

Vaishali Takkar eyes : वैशालीची शेवटची इच्छा पूर्ण, डोळे केले दान

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अभिनय जगतात आपली ओळख बनवणारी अभिनेत्री वैशाली ठक्कर आता या जगात नाही. पण, वैशाली ठक्करच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याआधी तिचे डोळे दान करण्यात आले. मृत्यूनंतर आपले डोळे दान करण्यात यावे, अशी वैशालीची इच्छा होती. ही इच्छा तिच्या कुटुंबीयांनी पूर्ण केली.

Vaishali Takkar
Vaishali Takkar

माहितीनुसार, वैशाली ठक्करला मृत्यूनंतर आपले डोळे दान करायचे होते. तिला तिचे डोळे खूप आवडायचे. आणि तिला आपले डोळे दान करायचे होते. वैशालीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी तिची अखेरची इच्छा पूर्ण केली. तिच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराआधी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तिचे डोळे दान केले.

अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या वैशालीने २०१५ मध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून आपली वेग‍ळी ओळख निर्माण केली होती. या मालिकेत तिने संजनाचे पात्र साकारले होते. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यानंतर वैशाली ठक्करला खूप प्रसिद्धी मिळाली होती. याचबरोबर तिने ससुराल सिमर का या मालिकेत अंजली भारद्वाज हे पात्र साकारले होते.

SCROLL FOR NEXT