मनोरंजन

‘जिवाची होतिया काहिली ‘ मालिका नव्या वळणावर; प्रेमात ट्विस्टची एन्ट्री

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : 'जिवाची होतिया काहिली' मधून  मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहे. या मालिकेत अर्जुन हा रेवथीच्या प्रेमात पडला असून रेवथीनेही मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि मालिका वेगळे वळण घेते आहे.

अर्जुन आणि रेवथी यांच्यात चांगली मैत्री झाली असून अर्जुन आपले प्रेम व्यक्त करणार का?, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. त्यातच आता मालिकेत नवीन व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. ती म्हणजेच मनीषाची.

सिमरन ही गुणी अभिनेत्री मनीषाच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसणार आहे. सिमरन हिची हि पहिलीच मालिका असून ती तिची व्यक्तिरेखा कशी रंगवते? हे पाहणं रंगतदार ठरणार आहे. मनीषा आल्याबरोबरच सगळ्यांची मनं जिंकते. त्यामुळे रेवथीच्या मनात राग निर्माण होऊन अर्जुन आणि रेवथी यांच्यामध्ये भांडण होईल का?, हे पाहणं उत्सुकतेचा ठरणार आहे. आता त्यांच्या गोष्टीला काय नवीन वळण मिळणार आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT