मनोरंजन

‘योग्य योगेश्वर जय शंकर’ मध्ये अभिजीत केळकर साकारणार बालगंधर्व

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ' योग्य योगेश्वर जय शंकर ' मालिकेत आता शंकर महाराजांच्या दिव्यत्वाचा अनुभव घेतलेल्या  बालगंधर्वांच्या गोष्टीला सुरुवात होत आहे. बालगंधर्वांची ही भूमिका लोकप्रिय अभिनेता अभिजीत केळकर साकारणार आहे. बालगंधर्व यांचा शंकर महाराजांशी असलेला ऋणानुबंध, त्यांनी महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती कशी अनुभवली? कसे महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आयुष्याला एक दिशा दिली यांचा उत्कट प्रवास मालिकेत बघायला मिळणार आहे.

बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक-अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या गायनाने आणि अभिनयाने मराठी नाटक जगप्रसिद्ध करणारे ते एक असामान्य कलाकार होते. मराठी माणसाच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेल्या व्यक्तींच्या यादीत बालगंधर्वांचा समावेश करावा लागेल. मराठी जनतेने बालगंधर्वांवर प्रेमाचा अक्षरशः वर्षावच केला, अशा अद्वितीय बालगंधर्वांसोबत शंकर महाराजांची भेट कशी घडली? तो अविस्मरणीय प्रसंग काय होता? हे प्रेक्षकांना मालिकेद्वारे बघण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

भूमिकेबद्दल बोलताना अभिजीत केळकर म्हणाला की, 'जेव्हा मला याबाबतची विचारणा झाली तेव्हापासून खूपच उत्सुकता वाढली. मला ही भूमिका करायचीच होती त्यामुळे मी होकार दिला. खरंतर माझा पहिल्यांदा विश्वासच बसला नव्हता, मला कधी स्वप्नात देखील वाटलं नाही की, मला ही भूमिका साकारायला मिळेल. कारण बालगंधर्व हा चित्रपट देखील करताना शंकर महाराज आणि त्यांचं काही नातं होतं किंवा आध्यात्मिक नातं त्यांच्यात होतं असं मला तेव्हा देखील माहिती नव्हतं. मात्र, चित्रपट करत असताना कधीतरी, केव्हातरी ही भूमिका साकारण्याची संधी मिळेल असं वाटत होतं. "A Dream come True" मला सेटवर आल्यावर ते अनुभवता येतं आहे. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, पण प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आणि उत्सुकता आहे.'

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT