नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शेजारी राज्यांमध्ये जाळला जात असलेला शेतकचरा तसेच औद्योगिक कारणांमुळे देशाची राजधानी दिल्लीत हवेचे प्रदूषण वाढले आहे. त्यानंतर आता राजधानीतील पाणीदेखील प्रदूषित झाल्याचे पहावयास मिळत आहे. कालिंदी कुंज येथे यमुना नदीत मोठ्या प्रमाणात पांढरा तवंग साचला आहे. त्यामुळे आगामी छट पूजेवेळी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
दिल्लीत व्यापक प्रमाणात छट पूजा साजरी केली जाते. नागरिक नदीत जाऊन अर्ध्य वाहतात. छट पूजेचा पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने तयारी सुरु केली आहे. मात्र तत्पूर्वीच नदीतील पाण्याच्या प्रदूषणाचे भयावह स्वरूप समोर आले आहे. सरकारने छट पुजेसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार नागरिकांना ठराविक घाटांवरच पूजाअर्चा करता येणार आहे. नदीत कोणत्याही प्रकारची पूजा सामुग्री अथवा अन्न वाहू देऊ नये, अशी सूचना उपराज्यपाल व्ही.के.सक्सेना यांनी दिल्ली सरकारला केली आहे.
हेही वाचा :