सातारा

‘किसनवीर’ साखर कारखान्याची निवडणूक लढवणार : मकरंद पाटील

अविनाश सुतार

वाई : पुढारी वृत्तसेवा : किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याची घोषणा आमदार मकरंद पाटील यांनी आज (मंगळवार)) केली आहे. वाई येथे झालेल्या मेळाव्यात पाटील बोलत होते.

गेली अनेक वर्षे किसनवीर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आणि कामगारांना फटका बसत आहे. शेतकऱ्यांचा ऊस तुटावा, कामगारांची कोट्यवधींची देणी द्यावीत, यासाठी दैनिक पुढारीने लढा उभारला आहे. त्यातच कारखान्याची निवडणूक लागली आहे. गतवेळी कारखान्यावर कोट्यवधींचे कर्ज आहे, असे कारण सांगत आमदार पाटील यांनी निवडणूक लढवली नव्हती. मात्र, पुढारीने यावर परखड लिखाण केल्याने अखेर वाई येथे झालेल्या मेळाव्यात पाटील यांनी किसनवीर कारखान्याची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT