पुणे

नाना पटोले : ‘उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली’

backup backup

पुणे; पुढारी ऑनलाईन : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. नाना पटोले यांच्या नव्या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

अधिक वाचा 

नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यापासून महाविकास आघाडीत वक्तव्यांची मालिका सुरु झाली आहे. त्यामुळे सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देतात. शिवसेनेला कामाला लागा म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिलेले चालते.

मी स्वबळाची भाषा बोलू लागलो, तर त्रास होतो. हे योग्य नाही. स्वबळाच्या घोषणेवर मी ठाम आहे", असे मत त्यांनी मांडले.

अधिक वाचा 

पटोले म्हणाले की, "पुण्याचे पालकमंत्री बारामतीकर आहेत. अजित पवार काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांची काम करत नाहीत.

यात संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आपण म्हणतो. पण, शेवटी त्यांचं एेकायचं की नाही हेसुद्धा तेच ठरवतात", अशी उघडपणे पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.

पटोले म्हणाले की, "पुण्याचे पालकमंत्री बारामतीकर आहेत. अजित पवार काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांची काम करत नाहीत.

यात संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आपण म्हणतो. पण, शेवटी त्यांचं एेकायचं की नाही हेसुद्धा तेच ठरवतात", अशी उघडपणे पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.

हे ही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT