पुणे

डाळिंब, सीताफळाला पावसाची प्रतीक्षा; फळांच्या दर्जात घसरण

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पावसाने ओढ दिल्याचा परिणाम डाळिंब, सीताफळ, कलिंगड, खरबूज आदी फळांवर झाला आहे. पाण्याअभावी या फळांच्या दर्जात घसरण झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या तुलनेत मागणी कायम असल्याने भाव स्थिर आहेत. बाजारात चेन्नई व हैदराबाद येथून मोसंबीची आवक सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने कलिंगड, खरबूज आदी फळांना मागणी घटली आहे. तर, पपईला चांगली मागणी आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने खरबूज, पपई व चिक्कूच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. अंजीर उत्पादक क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका फळांना बसत आहे.

हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारातील आवक निम्म्यावर आली आहे. पावसामुळे फळे खराब होत असल्याने अंजीराचे भावही उतरले आहेत. अन्य सर्व फळांची आवक जावक कायम असल्याने त्यांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. रविवारी (दि. 26) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 3 ट्रक, संत्री 1 टन, मोसंबी 25 ते 30 टन, डाळिंब 35 ते 40 टन, पपई 7 ते 8 टेम्पो, लिंबे सुमारे 1500 ते 1600 गोणी, पेरू 150 ते 200 के्रटस्, कलिंगड 3 ते 4 गाड्या, खरबूज 2 ते 3 गाड्या व अंजीरची अवघी 500 ते 600 किलो आवक झाली..

फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबे (प्रति गोणी) : 300-500, मोसंबी : (3 ते 4 डझन) : 150-350, संत्रा : (10 किलो) : 600-1000, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 30-140, गणेश : 10-30, आरक्ता 20-60. कलिंगड : 7-10, खरबूज : 15-25, पपई : 12-18, पेरू (20 किलो) : 250-400, चिक्कू (10 किलो) : 100-800, अंजीर : 20-80.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT