नांदगाव : 7/12 उतार्यावर वारसाची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणार्या तलाठ्यास दोन हजार रुपये स्वीकारताना एसीबीतर्फे रंगेहाथ अटक करण्यात आली. युवराज रामदास मासोळे असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
सध्या जिराईत जमिनी वहिती करण्याचे सरकारचे आदेश असून, या जमिनीवर वहिती करण्यासाठी दलालांच्या माध्यमातून शेतकर्यांशी संपर्क साधला जात आहे. यातच सातबारा उतार्यावर वारसाची नोंद करण्यासाठी तलाठी मासोळे याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.