उत्तर महाराष्ट्र

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन होणार

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : 

गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ च्या महामारीमुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. मात्र सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑफलाईन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सांगितले.

विद्यापीठाव्दारे घेण्यात येणाऱ्या उन्हाळी २०२२ च्या लेखी परीक्षा  बहुपर्यांयी (MCQ) स्वरुपात ऑफलाईन पध्दतीने विद्यापीठाने ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील. पदवीस्तरावर ६० गुणांची ही परीक्षा ९० मिनीटांची असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील व सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असेल. या परीक्षेकरीता निगेटीव्ह मार्कींग पध्दत लागू राहणार नाही.  पदव्युत्तर स्तरावर ६० गुणांची परीक्षा १२० मिनिटांची असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील व सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असेल.

या परीक्षेकरीता निगेटीव्ह मार्कींग पध्दत लागू राहणार नाही. बहिस्थ अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांची परीक्षा १०० गुणांची व १२० मिनीटांची असेल. एकूण ५० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला २ गुण राहतील.  आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा प्रचलित पध्दतीने दीर्घोत्तरी ऑफलाईन घेण्यात येतील. प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षांचे आयोजन हे प्रचलित पध्दतीने ऑफलाईन करण्यात येईल. अंतर्गत परीक्षा या देखील प्रचलित पध्दतीने शक्यतो दीर्घोत्तरी घेण्यात येतील.  पुढील वर्षाच्या म्हणजे २०२२-२३ मधील हिवाळी व उन्हाळी परीक्षा या पूर्वीच्या प्रचलित पध्दतीने दीर्घोत्तरी घेण्यात येणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT