उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शहरात पाच जणांच्या गळफास घेत आत्महत्या

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांनी गळफास घेत आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तीन तरुणांचा समावेश आहे.

सातपूर येथील श्रमिकनगर परिसरात राहणाऱ्या राहुल संजय पाटील (२६) याने शनिवारी (दि. ५) राहत्या घरात सायंकाळी गळफास घेतल्याचे आढळले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गंगापूर रोडवरील शंकरनगर येथे राहणाऱ्या त्र्यंबक राजाराम बोडके (३२) यांनी शनिवारी (दि. ५) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सामनगाव परिसरात राहणाऱ्या विशाल भीमराव जाधव (२६) यानेदेखील शनिवारी (दि. ५) राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे अंबड येथील गणेश चौक परिसरात राहणाऱ्या यश समाधान भोई (१९) या युवकाने राहत्या घरात शुक्रवारी (दि. ४) रात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी अंबड पोलिस तपास करीत आहेत. तर पाथर्डी फाटा येथील नरहरीनगर परिसरात राहणाऱ्या संपत पठाण बस्ते (५९) यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT