मराठवाडा

जालनेकरांना बंद पथदिवे सुरू होण्याची प्रतीक्षा

अनुराधा कोरवी

जालना, पुढारी वृत्तसेवा ः शहरातील विविध रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने ते सुरू कधी होतील, याची प्रतीक्षा आहे. गांधी चमन ते रेल्वे स्टेशन तसेच रेल्वेस्टेशन ते मम्मादेवी मंदिर इतर रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने छोट्या मोठ्या गुन्ह्यात वाढ झाली आहे.

पालिकेने या रस्त्यावरील बंद पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पथदिवे बंद असूनही ते सुरू होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बंद पथदिव्यामुळे महिलांना लुटण्याच्या घटनाही वाढत आहेत. शहरातील अनेक रस्त्यावरील बंद पथदिवे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत जालनेकर दिसत आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT