मराठवाडा

परभणी : पांगरी येथे तीक्ष्ण हत्याराने तिघांवर प्राणघातक हल्ला; एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी

मोहन कारंडे

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे किरकोळ वादातून तीक्ष्ण हत्याराने तिघांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून एक महिला व मुलगा गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. सत्यभामा नागोराव मुंडे (वय ३५, रा. जलालपूर ता. औढा, जि. हिंगोली) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आशामती फकीरराव बुधवंत (वय ४५ रा.पांगरी ता. जिंतूर), ऋषिकेश नाथराव सांगळे (वय १८) अशी जखमींची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर पोलीस ठाणे हद्दीतील पांगरी येथे मंगळवारी रात्री पाण्याच्या टाकीजवळ किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी तीक्ष्ण हत्याराने मारहाण झाल्याने सत्यभामा हिच्यासह तिघेजण गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सत्यभामा यांना मृत घोषित केले. आशामती आणि ऋषिकेश यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी रूग्णालयात प्राथमिक पंचनामा केला. अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT