दानोळी : पुढारी वृत्तसेवा : वारणा नदी क्षेत्रात पावसाने सलग आठ दिवस हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परिसरातील पावसाची हजेरी आणि वारणा काठावर पडणारा पाऊस यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोथळी-समडोळी बंधाऱ्यावर पाणी आले असून हा रस्ता बंद झाला आहे. संततधार पावसाने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे.
वारणा नदी परिसरातील कुंभोज, निमशिरगाव, कोथळी, कवठेसार, हिंगणगाव, उमळवाड, आदर्शगांव, चिपरी, तमदलगे, जैनापूर आदी भागात पावसाळा सुरु झाल्यापासून पावसाने कानाडोळा केला होता. पण गेल्या आठवड्यापासून परिसरात पाऊस सुरु झाल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. वारणा धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. परिसरातील पावसाची हजेरी आणि वारणा काठावर पडणारा पाऊस यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. संततधार पावसाने वारणा नदी पात्रा बाहेर आली आहे. या पावसाने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, परिसरातील दानोळी, कोथळी, कवठेसार, उमळवाड, चिपरी, जैनांपुर येथे पावसाची संततधार सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्यास दानोळी-कोथळी रस्ताही बंद होणार आहे.
हेही वाचा :