कोल्हापूर

कोल्हापूर: घाटकरवाडी येथे हत्तीच्या हल्ल्यात वनमजूर ठार

अविनाश सुतार

आजरा : पुढारी वृत्तसेवा : आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे टस्कर हत्तीच्या हल्ल्यात प्रकाश गोविंद पाटील गवसे (वय 52 ) यांचा मृत्यू झाला आहे. घाटकरवाडी हे हत्ती बाधित क्षेत्र असल्यामुळे येथे नेहमी वन कर्मचाऱ्यांच्या जंगल फिरती असते. आज सकाळी अशीच सुमारे १० ते १५ कर्मचारी फिरती करत असताना सुमारे अकरा वाजता अचानकपणे टस्कर हत्तीने हल्ला केला. त्यामध्ये गंभीर झालेल्या प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT